Sunday, November 6, 2011

~:_चार दिवस आयुष्याचे_:~



चार दिवस हसायचे, चार दिवस रडायचे
आयुष्याचे असतात फक्त चार दिवस जगायचे...

तुम्ही म्हणाल "कित्येक वर्ष जगले मोठे मोठे,
तू म्हणतोस ते चार दिवस असतात तरी कोठे?"...

चार दिवस आयुष्याचे तुम्ही गेलात का विसरून!
असे विचारताच बसू नका मात्र पंचांग पसरून...

चार दिवस कुठले ते मी सांगतो समजावून,
आता विचार करू नका तुम्ही डोके खाजवून...

तांबडे फुटते तेव्हा, जेव्हा जन्म आपला होतो
तेव्हापासून आपला पहिला दिवस सुरू होतो...

पहिला दिवस गुरुवार म्हणू, कारण नंतर सांगतो.
पहिल्या दिवशी आपण फक्त वाकडे तिकडे रांगतो...

या दिवशी सकाळी आपण नुसते रडतो.
पडत पडत खेळतो आणि खेळता खेळता पडतो...

हळु हळु दुपार होते तुटक चालू लागतो,
कोवळ्या बॉबड्या मुखातून बोबडे बोलू लागतो...

संध्याकाळ झाली की शाळेत जाऊ लागतो,
नंतर मात्र सिनेमाची गाणी गाऊ लागतो...

शालेय जीवन संपते तेव्हा रात्र येते धाऊन,
आपण सगळे निवांत पडतो निद्राधीन होउन...

शुक्रवार उजाडतो तेव्हा कॉलेज मध्ये असतो,
कुणी अभ्यास करतो तर कुणी वर्गातही नसतो...

तारुण्याची स्फूर्ति तेव्हा अंगामध्ये येते
गाड्यांवर नि घोड़यांवर वेगाने ती नेते...

शुक्रवारी भर दुपारी करियर घडवू लागतो
पोरकटपणा जाउन आपण प्रौढासारखे वागतो...

संध्याकाळी यशासाठी प्रयत्न होतात खूप
इथे मात्र भयंकर असते प्रयत्नांचे रूप...

ह्या वाराची रात्र होतांना यशापयश ठरतं
कुणी इथे जिंकतं तर कुणी दुर्दैवाने हरतं...

हरणारे पुन्हा प्रयत्न करतात तर जिंकणारे मिठाई खातात
असे करता करता शेवटी सगळे झोपी जातात...

शनिवार उजाडतो तेव्हा सगळे संसार थाटतात
आप्त-स्वकीयांसोबत सुख दु:ख वाटतात...


संसार सुरु झाल्यावर नसते माझे तुझे
तेव्हा फ़क्त वाहायचे असते कुटुम्बाचे ओझे...

पेंशनर होउन आपण खुशाल राहतो
आठवणीचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो...

हळु हळु चेह-यावरती सुरकुती उमटू लागते
आयुष्याची नाव आता सुट्टीचा किनारा मागते...

अश्या इच्छा अश्या मागण्या असतात फिरत हवेत
अश्यातच निद्रादेवी हळुच घेते कवेत...

रविवारी सकाळी यमाजी येतात
आपलं पाप-पुण्याचं प्रवासाच सामान स्वत:च हाती घेतात...

आपण शेवटी माणूस, म्हणून इच्छा वाढत जातात
"थोडा वेळ दयाल का अजून?" शब्द ओठांवर येतात...

प्रवास आपला होत असतो काळ वेळ कापत
नवे युग जाणून देव देतो थोड़ा वेळ मोफत...

तेवढ्या वेळात घ्यायचा असतो आपल्याला जगाचा निरोप
त्यावेळी विसरावे लागतात सगळ्या चूका आणि आरोप...

येउन ठेपते उम्बरठ्याशी एकदाची ती कातरवेळ
कारण संपत आला असतो चार दिवसांचा आपला खेळ...

यमाजी आता आपल्याला घट्ट मिठीत घेतात
'सुट्टी' म्हणून ते आपल्याला सोबत घेउन जातात...

सुटिचाच दिवस हवा होता चौथा
रविवारशिवाय दुसरा दिवस ही नव्हता...

आता समजलं का तुम्हाला गुरूवार का घेतला पहिला,
कारण निश्चित सुट्टीचा एक दिवस रविवारच राहिला...

Wednesday, October 19, 2011

रुसवा

-:रुसली कविता:-

धकाधकीच्या आयुष्याने पुसली आहे माझी कविता,
क़ाही केल्या हासत नाही, रुसली आहे माझी कविता...

(सद्ध्या अपूर्ण ...)

Tuesday, July 12, 2011

चारोळी

कोसळणारा पाऊस आईच्या कुशीतून बघतांना,
सात जन्म जगून गेलो एक जन्म जगतांना...

Sunday, June 12, 2011

_: तिची आठवण :_

_: तिची आठवण :_

पाउस म्हटला की मला तिची फार आठवण येते
तिची आठवण मला लगेच भूतकाळात नेते...

पावसातसुद्धा तिच्या सोबत मी किती किती फिरत असे,
माझ्या वाट्याचा चिम्बपणा सगळा तिच्यामध्ये मुरत असे...

ती भेटल्यापासुन असा एकही पाउस झाला नाही,
की ज्या पावसात तिचा हात माझ्या हाती आला नाही...

घरात एकटी ती नेहमी आक्रसूनच बसायची,
पावसात माझ्यासोबत मात्र अगदी खुललेली असायची...

मला ती आवडण्याचं एक खास कारण होतं,
फुला-फुलांचं वस्त्र तिचं, याचंच मला आकर्षण होतं...

भर पावसात चिखल तुडवित मीच एकटा चालत असे,
चिखालाचा स्पर्श तिला नको, म्हणून अलगद उचलून घेत असे...

तीही माझ्या खांद्यावर आपली नाजुक मान ठेवित असे,
माझ्या डोक्यावर पदर धरून मला पावासापासून लापवित असे...

थंड थंड वातावरणात तिला घेऊन उभे राहातांना,
मजा काही औरच होती गरम भुइमुगाच्या शेंगा खतांना...

पण हे सुख माझ्यासाठी फार काळ राहिलं नाही,
आता मात्र दैवाने माझं हीत पाहिलं नाही...

आलेल्या दु:खातून मनाला जरा सुद्धा उसंत नव्हती,
कदाचित आमची मैत्री नियतीलच पसंत नव्हती...

कोणतं दु:ख म्हणून काय विचारताय? माझी व्यथा ऐकायची आहे?
तर ऐका नीट कान देऊन, ही शोकांतिका अशी आहे...

एकदा तिला उचलतांना फुला-फुलांचं वस्त्र फाटलं,
माझं आवडतं वस्त्र फाटलं म्हणून दु:ख मनात दाटल...

दु:ख होऊन नुसतं काय होणार होता रडून,
म्हणून तिच्यावर उरलेलं कापडही मी रागाने टाकलं फाडून...

इतकं सगळं ऐकून तुम्ही योग्यच विचार करताय,
इतक्या खालच्या लेव्हल ला गेलो म्हणून मलाच धारेवर धरताय...

मीही उगाच मघापासून शब्दांच्या शेंगा सोलतोय,
असे काय करता मित्रांनो मी माझ्या छत्रिबद्दल बोलतोय...

Sunday, May 22, 2011

मृद्गंध

_मृद्गंध_

विसरलेल्या पावसाची आठवण 'मृद्गंध' होते...
हासणे मग थांबते अन् बोलणेही बंद होते...

Wednesday, May 18, 2011

गज़ल की बात

_गजल की बात_

इक गजल की बात सुनाता हूँ, इक गजल ने बात सुनाई थी...
बरसते घर की टपकती छत ने बरसात की रात सुनाई थी...

Monday, May 16, 2011

सफर

_सफ़र_

राह पथरीली और दूर है मकाम मेरा
मैं हू तनहा मगर दोस्त ये जहाँ मेरा...

साथ देने मेरा कोई भी नही इस सफ़र में
आईना देखके बढ़ता है हौसला मेरा...
मैं हू तनहा...

उनके जो अश्क बहे हमसे यूँ जुदा होके
बस तबस्सुम में छुपाता हैं दिलरुबा मेरा...
मैं हू तनहा...

ये कहानी तेरी तूनेही क्यूँ ख़त्म कर दी
देखले अब शुरू हुआ है सिलसिला मेरा...
मैं हू तनहा...

वो चूड़ियों की खनक मैने जब सुनी तो लगा,
या है डोली तेरी या उठा है जनाज़ा मेरा...
मैं हू तनहा...

चित्र

खळखळूनी हासता ती वाढते आयुष्य माझे...
हासण्याचे चित्रही मग काढते आयुष्य माझे...

नशा

_:नशा:_


हृदय माझे जाळण्यासाठी नशेला टाळतो,
खोल जखमा त्या सुगंधी अद्यपी कुरवाळतो...

पाहिली होती कधी मी ही नशा डोळ्यांमध्ये
फक्त स्मरूनी आज तिजला मी मला कवटाळतो....
खोल जखमा...

शुभ्र फेसाळुन झाली ही सुराही अप्सरा,
या सुरेला फक्त बघुनी मी तिच्यावर भाळतो...
खोल जखमा...

धुंद होऊन पाऊले जाती जुन्या वाटेकडे,
हात खेचुन मीच माझा, मी मला साम्भाळतो...
खोल जखमा...

घोट पहिला घेऊनच मग दुग्धप्याला ठेवतो,
पीत नसुनी मद्यापींचे नियम सारे पाळतो...
खोल जखमा...

ऊन्ह-पाऊस खेळती मम जीवनाच्या अंगणी,
मीच देतो स्मीत मजला मीच अश्रू ढाळतो...
खोल जखमा...

शब्द बनले मद्य, जेव्हा कागदावर उतरले,
खूप झाली ही नशा, मी प्रेमपत्रे जाळतो...
खोल जखमा...

नजर ती, की वज्र होते? की तीरांचा पुंजका?
झेलूनी आनंद ह्र्दयी का असा रक्ताळतो...
खोल जखमा...

शिंक

_शिंक_

गुदगुल्या होतात जेव्हा तंतुच्या नाकातल्या,
शक्तिने येतात लहरी वायुच्या नरड्यातल्या...

शिंक येता नासिकातिल केस सरसर हालती,
वादळाने ज्याप्रमाणे वृक्ष-वेली डोलती...

तपकीरीची चिमुट जेव्हा बोगद्याला स्पर्शिते,
शिंक येउन छान मग डोकेदुखीला शमविते...

फोडणी कढईतली जेव्हा जळे मिरचीसवे,
घरभरातुन शिंकण्याचे सूर येती नवनवे...

उंबरा ओलांडतांना अपशकूनी जी असे,
तीच अंती बोलण्याच्या सत्य-ग्वाही देतसे...

मैत्रीचा वड

_मैत्रीचा वड_
मी मेघ बनाया गेलो, अन् पाऊस बानूनी पडलो...
फुंकर वार्‍याची आली, मी हसता हसता रडलो...

ती काय असावी स्वप्ने, जी कधीच माझी नव्हती,
परक्यांच्या स्वप्नांसाठी मी उगाच का धडपडलो?

"एकटा कधी मी नसतो, सोबतीस इतके यार"
विसरूनी ख-या जगताला स्वप्नातच मी बडबडलो...

भावना ही माझी होती अन् शब्द तिने दिधलेले,
मग कवन बनून मी माझे बघ तिच्याच ह्र्दयी भिडलो...

का मला न हे उमजावे वागणे कुणाचे नकली,
मी प्रीत बनून का सच्ची सर्वांच्या ह्र्दयी जडलो...

वड मैत्रीचा जो दिसला तो प्रचन्ड मोठा होता,
पारंब्या बनुनी अगणीत मी वडास त्या लडबडलो...

Friday, May 6, 2011

चारोळी

कधीतरी तुझ्या डोळ्यांना
माझ्या आठवणीत जागू दे...
कधीतरी तुझ्या मनाला
त्याच्या मनाने वागू दे...
________________________

आनंदाश्रू असताना
जे अमृतासारखे वाहतात...
तेच अश्रु दु:खामध्ये
विष बनू पाहतात...
________________________

डोकं एकदा तापलं की
तुझासुद्धा राग येतो...
पण या क्षणिक रागामध्ये
प्रेमाचाच भाग येतो...
________________________

तुझ्यासोबत खेळताना
मी हरण्यासाठीच खेळत गेलो...
जिंकण्याकडे दुर्लक्ष करून
मी मैत्रीचे नियम पाळत गेलो...
________________________

गुलाबाच्या फुलासोबत
किमान एकतरी काटा असतो...
'त्या' नाजुक फुलाच्या संरक्षणात
त्याचा सिंहाचा वाटा असतो...
________________________

Wednesday, May 4, 2011

चैन

कभी तो जाएंगे ये दिन... कभी तो आएंगे वो पल...
ज़रा मेहनत तो करले आज... जियेंगे चैन से हम कल...

Tuesday, May 3, 2011

कविता

_:कविता:_ ("कविता म्हणजे नेमकं काय?"या प्रश्नाचे माझ्या मनाने दिलेले उत्तर...)

खास लिहिण्यालाच कविता आज मी ठरवून बसलो
आरश्या पुढतीच बसुनी मी मला पाहून हसलो
दिवस गेला, रात्र गेली प्रसवली नाहीच कविता
न ठरविता कागदावर जी उतरते तीच कविता...

सहज पुसता सांगती ते काव्य स्फुरते चिन्तनाने
बसुन निश्चल एक चित्ती मात्र स्रुष्टी-दर्शनाने
सुमन सुंदर बघुन सुद्धा स्फुरत ही नाहीच कविता
स्फुरत नाही पण फुलातुन जी उमलते तीच कविता...

शब्द जेव्हा सौम्य असतो, भावना ही सौम्य असते
सौम्य शब्दांच्या उन्हाची तीव्रता ही सौम्य असते
सौम्य शब्दांच्या सुरांवर सौम्य ही असतेच कविता
सौम्य असुनी जी मनाला थेट भिडते तीच कविता...

प्रियकराची शब्दगंगा वाहते नि:शब्द हाउन
प्रेयसीला प्रियकराचा पोचते संदेश हाउन
प्रेयसीला प्रियकराची कळत ही नाहिच कविता
प्रेयसीला कळुनही जी कळत नाही तीच कविता...

जन्म कवितेतून होतो, मरण ही कवितेत होते
जन्म-मरणाचि हकीकत कथन ही कवितेत होते
सार सांगुन जीवनाचे सरतही नाहीच कविता
ही हकीकत सरुनही जी सरत नाही तीच कविता...